Sunday, May 29, 2011

हजारो ख्वाईशें ऐसी

हजारो ख्वाईशें ऐसी


जो साकार हो न पाई

फिर भी मेरा मन है प्यासा

उसी लव मै जलने की एक आशा



मैने दुंढा है सुकुन

हर दर्द के पंखडियो मे

तेरे यादों के जरा जरा पे

मकबुल है मेरा आशियाना



मैने कहा है मेरे मुकद्दर को

बावजुद तेरे हजार कोशिशो के

हरा रहेगा मेरी ख्वाबों का

एक जलवा मेरा आशियाना



तुझे सौगात है हर दर्द की

जो सितम उठाये है मैने उल्फत मे

मेरी तो है गुफ्तगु उनकी रुह से

फिर फासलो कि क्या अहमिहयत



मैने डाली है कश्ती पानी मे

समंदर भी है बेहोश सुनामी से

कश्ती के हजार टुकडो पे

मैने लिखा है नाम तुम्हारा



मै क्युं सुनाऊ यह दास्ता

बार बार तुझे मगर

तु तो है ना मुराद पत्थर

तेरा रुह से क्या वास्ता



मै पहुंचा हुं उस मुकाम पे

खुदा भी कुछ बिघाड न पाये

अरे मै तो रुह का सौदागर

तु तो सिर्फ दर्द का बेपारी



ओ खुदा अब तो रहम कर

सिख ले दानत इसी आदमी से

दर्द के बेपार को छोडकर

तु भी लहरा दे परचम रुह का



मेरे विस्मिल...

अब भी है एक ख्वाईश बाकी

हम दोनो के रुह की मजार पर

तु भी चढा दे तेरी ओर से एक चादर

ऒर ढांल एक तो आंसु

परवरदिगार तेरी आंखो से मगर



सुधाकर

हे मला उमगत नाही

आकाशी विहरे बगळा


आपल्याच मस्त धुंदित

जमिनीवरील बेडुक त्यास

पाण्यात मग का पाही.....



हे मला उमगत्त नाही....



भरधाव वेगाने धावे

तो अश्व पार चौखुराने

त्याचाच मित्र म्हणवणारा

कर्दमात का पाही असुयेने...



हे मला उमगत्त नाही....



तो राजहंस डोलत

मोती वेचित जाई

शेजारी बदक मात्र

मेलेल्या मासळी का खाई...



हे मला उमगत्त नाही....



मग लेक येता तारुण्यात

माय तीची पाठराखण करते

अन लेकिच्या माघारी ती

आरशांसी का सलगी करते.......



हे मला उमगत्त नाही....



मुलास मिसरुड फुटता

बापास होतसे अभिमान

अन त्याची मैत्रिण देता साद

हा का कावराबावरा परेशान.....



हे मला उमगत्त नाही....





सुधाकर

अरे पावसा ...

अरे पावसा ... का बरे तु असा येतो




तु ऎन दुपारी

असा का अंधार करतो

तु प्रत्येक वेळी येण्याची

मनाला चाहुल का देता

तु कोसळण्याआधी

आसमंत का गोंजारतो

पक्षांच्या पंखामध्ये

हवेचे शिड का भरतो

तु मल्हार राग गाण्याआधी

असा जोगिया का गातो



अरे पावसा ... का बरे तु असा येतो



मंदीरातील ते मंत्रोच्चार

मग का असे सादळती

मंदीरातील सा-या घंटा

तुझे ढोल का बडविती

मंदीराच्या त्या मंडपावर

तु असा का आवाज करतो

शंकरापुढील बिल्व प्रसादावर

का रे मग मुंगळ्यांची दाटी

मग त्या घामट शेजारतीला

तु आर्द्र आरती का होतो...

आसमंतास ओले करतांना

ईश्वरास का कोरडा ठेवतो..

अरे पावसा ... का बरे तु असा येतो



तु धरितीस मग

हिरवा शालु देतो

अरे को-या शालुवर

पुन्हा का असा वेडा होतो

प्रेमाची ही वेडी रीत

ती का बरे उधळते प्रित

त्या प्रितीचा मग सुगंध

रानावनात भिरभिरतो

मातीच्या मग कणाकणात

निर्मितीचा गंध ते जाळतो..



अरे पावसा ... का बरे तु असा येतो



शेतात मग चाले

शेतकामाची गडबड घाई

बिचा-या शेतक-याला

तु का बरे उसंत देत नाही

तु आषाढात रप रप पडतो

अन श्रावणात वाकुल्या दावी

भाद्रपदात मात्र तु

ठिय्या धरुन राही

बिचा-या शेतक-याने

किती सोसाव्या तुझ्या लहरी

परि तो शांत मनाने

तुझेच आभार मनी मानी

उभ्या पिकाकडे बघुन

तो देई त्रुप्तीचा ढेकर

उद्याच्या वेडया स्वप्नांचे

तो आजच इमले बांधी

तु कुणा देई भरघोस

कुठे उन्हाळा भरी

दुष्काळाच्या आगीत बिचारा

शेतकरी पिसून येई

कुठे अतिव्रुष्टीने

तु डोळ्यात पाणी आणतो

पुराच्या पाण्याबरोबर

तु आमचे संसार नेतो



अरे पावसा ... का बरे तु असा येतो



सुधाकर

किनारा ...

गर्दीत असूनही


मी राही एकटा

माझ्याच आस्तित्वाच्या शोधात

मी असे फाटका



निरंतन वेदनेच्या शापात

मी मजशी जाळी

तरी स्वप्नांच्या उतरंडीतुन

मी वाट काढी



अंतिचा काळोख माहित असतांना

स्वप्नांची चांदरात मी का आठवी

आठवणींच्या हया हिंदोळ्यातच

मऊ स्पर्शाची वेल का साठवी



स्पर्शाची हुरहुर का वाटे

क्षणिक सुखासाठी

आठवणींचा तो सुगंध मग

मनावर का मेघ दाटी



मग नितळ सलील भावनांचे

मनात सरोवर दाटे

अन अशाच किना‌-यावरती

तुझ्या भेटीचे स्वप्न पहाटे



्सुधाकर

पाण्यावरचे पक्षी ( एक स्वरचित्र )

अलगद उतरती .... ते पाण्यावर


चालत जाती ..... ते पाण्यावर



पाण्यातच चोंच खुपसुनी ... उदर भरती ते पाण्यावर ‌‌॥



पाण्यातच पाहुनी .... आकाशाची नक्षी

पाण्यावरच ते काढी .... पाण्याचीच नक्षी



उडुन पाण्यावर एका माळेने

अंबरात ती विहरत जाती

पुन्हा मोत्याचा सडा पाडत

ओळीनी ती अलगद उतरती....





त्या पाण्यावर ...त्या पाण्यावर



सुधाकर

माझ्या मुला.... तु IPL बघ

ग्रुहपाठाला


दे तु चाट

जाग्रण कर

शाळेला तु

मार बुट्टी

परिक्शेची तु

सोड चिंता

खाण्याची तुला

कसली फिकीर

म्यागी, पास्ता

पोटात भर

टिचरचा तु

सोड नाद

माझे ऎक....

शाळा सोड

पाटी फोड

पुस्तके तु

रद्दीत विक ....



माझ्या मुला .... तु IPL बघ.... तु IPL बघ



टाईम टेबल तु

लक्शात ठेव

पिचवर

दे लक्श

सचिनला काही

समजत नाही

खेळाडु

तुच निवड

ब्याटींग तु

आधी घे

रनरेट कडे

दे लक्श

मार फोर

मार सिक्स

रन तु

चोरित रहा

उभा कर

मोठा स्कोर

खेळाडुंचा बायोडाटा

नको विसरु

बोलिंग कडे

दे लक्श

आखुड टप्पा

टाकु नको

यार्करचा

मारा कर

क्याचेस तु

टिपित रहा

फिल्डींगनेच

म्याच विन होते

रन तु

देऊ नकोस

वाटल्यास

बालर बदल

गिलख्रिस्ट

सायमंडची

फिकिर नको

पोलार्डला

तु पुढे आण

मार six

टाळ्या तु

वाजवित रहा ...

तु सतत

TV बघ



माझ्या मुला .... तु IPL बघ.... तु IPL बघ



प्रिटी झिंटा

दिसते क्युट

दिपिका ही

हलवते हाथ

शिल्पा-राजचा

नाद सोड

शमितावर तु

लक्श केंद्रित कर

शाहरुख, सॊरभला

दे धक्का

चिअर लिडरस

बरोबर नाच

चुकवु नको

एकही ठोका ....



माझ्या मुला .... तु IPL बघ.... तु IPL बघ



दुखतात का

तुझी बोटे

सोड मग तु

उंगली क्रिकेट

सेहवागच्या

आईचे ऎक

तु फक्त

TV बघ

टिव्ही वरच्या

जाहिराती बघ

मुंगुस बटेचा

हट्ट सोड

पुढच्या वाढदिवसाला

घेऊन देईन

मचफिक्सींगकडे

नको लक्श

स्पाट फिस्कींगवर

तु भर दे

पॆज मार

सर्वांशी

कमवु दे

त्यांना पॆसा

ललित मोदीला

हिरो कर

देशाला नाही

काही काम

उत्पन्न बुडव

ऎश कर

देशाबरोबर तु

TV बघ

तु सोड

करिअर वा-यावर

नॊकरीला

मार लाथ

धंद्याचे

दिवाळे काढ

तु फक्त एकच कर ....



माझ्या लाडक्या ...तु फक्त IPL बघ.... तु फक्त IPL बघ



सुधाकर

शरीर व आत्मा

निसर्गाने दिलेले शरीर


जेव्हा कुरकुरायला लागते

तेव्हा आठवतो....

कर्मसिद्धांत....



आत्म्याला व्यक्त होण्यासाथी

दुसरे माध्यम का सापडु नये...?

....का गावी त्यांनी गिते

शरीराच्या भागाभागातुन

वेदनेच्या रुपांत....



माणसाने ह्यात काय समजावे..?

आपले प्राक्तन...

कि पुर्व जन्माचे कर्माचे भोग



अरे शरीराचा एक भाग

वेदनेने व्याकुळतो....

तेव्हा कुठे असतो ... आत्मा ?

नेहमी प्रमाणे नामानिराळा...

भोग तर शरिरालाच भोगावे लागतात

अन क्रेडिट घेऊन जातो

तो अगम्य,... अनामिक...आत्मा

त्याला मुक्तीच पाहिजे असेल

तर तो सरळ का सांगत नाही...?



परक्या घरात शिरुन

हा प्रपंच का मांडावा त्याने ...!

वेदनेनी डबडबल्या शरिराच्या रंध्रारंध्रातुन

संगिताची सिंफनी जेव्हा साकारते....

तेव्हा कदाचित....मुक्तीची पहाट त्याला दिसत असावी..



सुधाकर

ती ... अन डोळे

मी तुझ्या थेट डोळ्यांमध्ये पाहतो


.....अन....तु ही माझ्या....

असे किती दिवस तरी चालु राहते

काही विशेष बोलण्याची

व्यक्त करण्याची आवश्यकता वाटतच नाही

..कारण...डोळेच साधतात सर्व संवाद

...सर्व स्वरांचा मेळ ....

नक्शत्रांचे विभोर न्रुत्य..

आशा निराशांचा लपंडाव..

अन डोळ्यातच दाटते

आश्वासक प्रेमाची प्रकाशवाट

अन मग चालु राहतो शोध

एकमेकाच्या अस्तित्वाचा एकमेकाच्या डोळ्यात ...



कारण...

डोळ्यांनाच अंग फुटते

अन फुटतात सह्स्त्र डोळे

सुर्यातुन हजार सुर्य बाहेर पडावे तसे ..

अन होते मग फक्त .. होरपळ..

वेदनेची अन अंगाची ही...

ही वेदना जाळ्त असतांनाच ..

विरहाची माय गर्भार होते

अन .. तिला डोहाळे होतात

एकमेकापासुन दुर जाण्याचे

विरहात जळ्तांना ही ...

का कोणास ठाऊक ..

संन्यस्त व्रुत्तीचा नाग

मनाला डसुन जातो ...



अन ...

मग तु दूर निघुन जाते ...

पण दिसतात ते डोळे ..

अन तु कुठे तरी दिगंतात लोंबकळ्तांना

आठवणींचे पक्शी घिरट्या घालतात

अन .. मारतात चोंच

त्याच त्याच जखमेवर



का .. करुन घेतली आम्ही आत्मवंचना

जगाला कळण्याआधीच ..

सत्याला सामोरे जाण्याची ताकद

नव्ह्ती की .... एकूणच आयुष्याच्या

क्शणभंगुरतेची किड तेव्हांच

दबा धरुन बसली होती मनांत ..

कि मनाला होती ...

अमोल ... तरल... पवित्र प्रेमाला

व्यवहाराची चुड लावून

करपू न देण्याची

एकाकी ओढ ...



आता सकाळ संपुन माध्यान्हिचा सुर्य

केव्हांच उतरणीला लागलाय ..

तेव्हां मनावरील सर्व गाळ बाजुला सारल्या जातो

अन वॆषम्य वाटते व हसु ही येते

स्वत:च्या मनातील उन सावलीच्या खेळाचे



पण... अजुनही तसे डोळे दिसले कि ...

तुच पुन्हा दिसायला लागते ...

अन ... शोधत राहतात .. तेच डोळे

... त्याच डोळ्यातील ... आसवांचे तळ ...

..... निरंतर .... !





सुधाकर

हिरवे शेत

हिरव्या चिंचा ... हिरवे रावे


हिरव्या शेतात ... मन गुंतावे



हिरव्या शेताला ... हिरवी पायवाट

बांधावर उभी ... हिरवी बाभुळ ताठ



खोल खोल विहिरीला .. पायय्रा एकूण चाळीस

नितळ शुभ्र पाण्यात ... आसरा मात्र कासाविस



दांडाच्या पाण्यावर ... माजते उसाचे रान

अन शेजारीच उभा ... सुर्यफुल मात्र छान



सरळ मोठ्या बांधावर ... वेडी बाभुळ उंच

तिला खुणावते मग ... शेजारचीच चिंच



कवठाच्या झाडाला ... कवठे लागतात उंच

लिंबाच्या झाडावर मात्र ... वानरेच पंच



भुईमुगाच्या पिकावर ... वानराचा डोळा

गव्हाच्या ओंब्यासाठी ... उंदरे होती गोळा



ज्वारीच्या शेतात मामा ... गोफण घेऊन उभा

त्याला पाहुन करतात ... पाखरे ह्ळूच तोबा



ज्वारीच्या खळ्याला ... रात्रीचा पहारा

थंडीच्या दिवसात मात्र ... शेकोटिचा सहारा



माचणावरील अंथुरणात ... टोचे गवत फार

पहाटेच दवेचा खावा ... गपगार ओला मार



अशा हिरव्या शेतात ... माल होतो खंडीने

मग मामा जातो घरी ... माल घेऊन बंडीने



सुधाकर

अब तो पिला दे....एक बोतल मेरे साकी

मुद्द्त से न हमने देखा है वो चेहरा


सपने भी फसाद पर उतरे है साकी

ना जायज रिश्तो के चर्चे है मेरे शहर मे

अब तो पिला दे....एक बोतल मेरे साकी



कितने सपने दिखाये थे तु ने उल्फत मे

कितने जज्बो को दि थी तु ने हवाए

उसी आग मे..झुलस रहा हुं साकी

अब तो पिला दे....एक बोतल मेरे साकी



कितनी मांगी थी मिन्नते मैंने बार बार उनसे

लताडा उसी को..उन्होने बेरहमी से

इसीलिए जहर को ..हमसफर बना दे साकी

अब तो पिला दे....एक बोतल मेरे साकी



बहारे आई थी..कभी चमन मे

जागे थे आरमां मेरे भी मन मे

उसी को रौंदा है..मेरे सनम ने साकी

अब तो पिला दे....एक बोतल मेरे साकी



.....सुधाकर

व्यवस्था व आपण

जेव्हा व्यवस्थाच माणसाला षंढ बनविते


तेव्हा आपण नाही काही करु शकत

प्रत्येक व्यवस्थेचा गर्भ माणसाच्या गर्भाबरोबरच

पोसल्या जातो हे का नाही आपण ध्यानात घेत



माणसाचे जिन्स जर बदलता येत नाहीत

तर व्यवस्थेचे जिन्स कसे बदलणार ... ?

व्यवस्थेला किती ही शिव्या दिल्या,

निंदा नालस्ती केली,जाळण्याची, गाडण्याची

भाषा केली तरी व्यवस्था नाही बदलत

किती क्रांत्या झाल्या, सुर्याचा प्रकाश पृथ्वी वर

आणण्याची भाषा केली, अंधार गिळ्ण्याची

व हटवण्याची भाषा केली

नव नवे संकल्प केले

तरी व्यवस्था ही बदलत नाही अन माणसे ही

राजकिय व सामाजिक क्रांतीच्या वल्गना करा

किंवा आध्यात्माच्या आणि आत्म्याच्या उन्नतीचे

गारुड मांडा

कुत्र्याच्या शेपटा सारखं सतत वाकडं

राहणार माणसाचे नसिब....

नाही रे बदलत ....



एकटा मनुष्य संत, विभुती वगॆरे होऊ शकतो

परंतु समाज नाही

गटारात चुळुक भर शुध्द पाणी टाकल्याने

गटार तर शुध्द होत नाहीच

पण टाकलेले चुळुकभर शुध्द पाणी ही

दुषितच होते

माणुस आणि समाजाचे ही असेच आहे



माणसाला आत्मा असतो

समाजाला असतं एक भगभगणारं

वासनेचं लिंग

चित्र विचित्र वासनेनं रटरटलेलं

शरीर घेऊनच समाज वावरत

असतो आपल्या सर्वांच्या मनात,

सदा अस्वस्थ अश्वत्थामा सारखा

किती तरी येशु, बुध्द, गांधी, कृष्ण

मार्क्स, ग्यानेश्वर, तुकाराम,साक्रेटीस,

मार्टीन ल्युथर, आंबेडकर

पचविले नाहीत का या निर्लज्य समाजाने

अरे ..समाज हा सहस्त्र विषारी बुबळाचा

आक्टोपस आहे

तो खातो फक्त माणसांना

त्यांच्या इच्छा, आकांक्शाना व स्वप्नांना

गर्भाबरोबरच घेऊन आलेल्या

समाजावर आपण पोसले जातो

अन.. त्यामुळे त्याला बदलण्याची भाषा

वायफळ ठरते

आपण विसरतो कि कुणा गाढवाने

जन्माला येतांना नव्हती दिली

आपल्याला ग्यारंटी, सुखी आयुष्याची,

न्यायाची व समतेची

म्हणुन विसरु नको

दहा हजार वर्षापुर्वीच्या माणसांचा

व आताच्या माणसाचा

मेंदु व पोटाचा आकार व रचना

सारखीच आहे.

अन विसरु नको...

वेशा व सती सावित्री स्त्रीला

सकाळी धुक्यात पडणा-या स्वप्नांची

जातकुळी सारखीच असते.



सुधाकर